पर्यटन स्थळे

नायगाव अभयारण्य

भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे. नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची…

हत्तीखाना (लेण्या)

शिव लेणी (जोगाई मंडप; हत्तीखाना) ह्या महाराष्ट्र राज्यातल्या, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील हिंदू गुफा आहेत. या संपूर्ण लेणी, त्या काळी मालवा प्रांत असे नाव असलेल्या आणि परमार वंशातील राजा उदयादित्याच्या (कारकीर्द : इ.स. १०६० ते १०८७) राजवटीत टेकडीच्या आत खोदून…

आद्यकवी मुकुंदराज समाधी

मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी…

श्री दाक्षायणी देवी मंदिर 

औरंगाबादच्या लासूर गावात शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचं भव्य मंदिर वसलेलं आहे. ही देवी लासुर गावचं आराध्य दैवत आणि वैजापुर तालुक्याचं ग्रामदैवत आहे. प्रसन्न मूर्ती, आकर्षित करणारी विद्यूत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप आणि अंगभर दागिन्यांनी नटलेली ही देवी दाक्षायणी दक्ष…

अंतूर किल्ला

अंतूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे. हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये आहे. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. कसे जाल ?अंतूरच्या…

गौताळा औटराम घाट अभयारण्य

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य सुमारे २६० चौ. कि. मी. क्षेत्रात पसरलेले आहे. स्थापना१९८६ साली गौताळा अभयारण्याची स्थापना झाली. हे अभयारण्य औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. कन्नड तालुक्यामधील १७ गावातील वनक्षेत्राचा या अभयारण्यात समावेश…

औरंगाबाद लेणी

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे…

संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

गोदावरीच्या काठी संत एकनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. – सागवान लाकडातून मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. – मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तिथे भव्य दत्तमंदिर देखील आहे. – साडेचारशे वर्षांची परंपरा असलेल्या नाथषष्ठी यात्रा उत्सवाला फार महत्व आहे.…

नेमगिरी जैन मंदिर

श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी संस्थान, नेमगिरी, जिंतूर, महाराष्ट्र (आतिषय क्षेत्र) मंदिरांची संख्या: ०२(७ लेणी), पहाड/डोंगर: ०२, नेमगिरी वाहनाने जाता येते तर चंद्रगिरीला २५० पायऱ्या आहेत, ऐतिहासिक महत्त्व: नेमगिरीवरील लेणी गोलाकार पद्धतीने आहेत. गुहा क्र. 3 मध्ये भगवान शांतीनाथजींची…

धारुर किल्ला

बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्वाचे शहर आहे. सातवहानांच्या काळापासून एक संपन्न व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिध्द होते. राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली किल्ला…